बालपण, तारुण्य, आणि बुद्धत्व या तीन अवस्था माणसाच्या आयुष्यात असतात. यातील वृद्धत्वासाठी आर्थिक तरतूद तरुणपणीच केली तर हा काळ सुखाचा समाधानाचा जातो. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष होते आणि 'नको ते म्हातारपण' असे वाटू लागते. असे होऊ नये म्हणून सरकारने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच (निवृत्ती वेतन) सोय केली होती.
या पेन्शनची प्रत्येकालाच किती गरज आहे हे प्रा. क्षितीज पाटूकले यांनी 'पेन्शन आता प्रत्येकाला!' मधून हे स्पष्ट करून वृद्धापकाळातील आर्थिक नियोजनाची माहिती दिली आहे. पेन्शन म्हणजे नेमके काय, पेन्शनची गरज, प्रत्येकाला पेन्शनसाठी तरतूद कशी करता येते, त्यासाठीच्या योजना, नॅशनल पेन्शन सिस्टीम, स्वावलंबन पेन्शन योजना, पेन्शन आणि आर्थिक नियोजन, निवृत्तीचे जीवन आणी निवृत्तीनंतरचे जीवन, वैयक्तिक पेन्शन नियोजन आणि अंमलबजावणी, प्रधानमंत्री जन धन योजना, पेन्शन कशी मिळते, पेन्शन तक्रार निवारण प्रणाली आदी प्रकरणामधून पेन्शन गुंतवणूक, विमा यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
जोडीला तक्ते, आकृत्या, आलेख यामधून विषय सोपा करून सांगितला आहे. तसेच विविध पेन्शन योजनांच्या अर्जांचे नमुनेही दिले आहेत.